राज्यातील ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून तब्बल 99,704.36 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 रोजी महसूल व वन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला असून याबद्दलची सविस्तर माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.
अतिवृष्टी पूर नुकसान भरपाई 2024
अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/पुर यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मोठ्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी संदर्भाधिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु. 99704.36 लक्ष्य इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्ही लेखाच्या शेवटी डाऊनलोड करून वाचू शकता.
निधीचा तपशील खालीलप्रमाणे
| अनुक्रमांक | जिल्हा | कालावधी | मंजूर निधी |
| १ | रायगड | ऑगस्ट २ ० २ ४ | ४ .७ ५ |
| २ | रत्नागिरी | ऑगस्ट २ ० २ ४ | ३ .७ ३ |
| ३ | सिंधदुर्ग | ऑगस्ट २ ० २ ४ | ५ .५ ३ |
| ४ | चंद्रपूर | सप्टेंबर २ ० २ ४ | ९ ३ २ .० २ |
| ५ | बीड | ऑगस्ट २ ० २ ४ | ५ ४ ९ २ .९ ८ |
| ६ | लातूर | ऑगस्ट २ ० २ ४ | २ १ .० ८ |
| ७ | परभणी | सप्टेंबर २ ० २ ४ | ५ ४ ८ ५ ९ .८ ९ |
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
